शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

महाबळेश्वरात ध्वनीप्रदूषण करणारे ‘हॉटेल कीज’ सील प्रदूषण नियंत्रण मंडळाची कारवाई : नळ, वीज तोडल्याने खळबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2017 23:43 IST

महाबळेश्वर : ध्वनी प्रदूषण करून पर्यटनस्थळाची शांतता भंग केल्याप्रकरणी प्रदूषण नियंत्रण मंडळाने महाबळेश्वरात शनिवारी मोठी कारवाई केली.

ठळक मुद्देरात्री दहानंतर ध्वनीक्षेपकांवर बंदी आहे. याचे भानही या मंडळींना नसते.शहरालगतच्या जंगलसदृश्य विभागात राहण्याकडे लोकांचा कल वाढला आहे

महाबळेश्वर : ध्वनी प्रदूषण करून पर्यटनस्थळाची शांतता भंग केल्याप्रकरणी प्रदूषण नियंत्रण मंडळाने महाबळेश्वरात शनिवारी मोठी कारवाई केली. येथील ‘हॉटेल किज’ला सील करून हॉटेलचा वीज व पाणी पुरवठा खंडित केला. नाताळ अन् ३१ डिंसेबरच्या तोंडावर कारवाई केल्याने हॉटेल व्यावसायिकामध्ये खळबळ उडाली आहे.

महाराष्ट्राचे नंदनवन, थंड हवेचे ठिकाण म्हणून महाबळेश्वर जगभर प्रसिद्ध आहे. वाढते वायूप्रदूषण, धकाधकीच्या जीवनाला कंटाळेले पर्यटक चार दिवस शांतता मिळविण्यासाठी महाबळेश्वरात येतात. शहरापेक्षा शहरालगतच्या जंगलसदृश्य विभागात राहण्याकडे लोकांचा कल वाढला आहे. त्यामुळे शहरापेक्षा लगतच्या परिसरात हॉटेल व्यवसाय चांगलाच फोफावला आहे. शहरापासून थोडे दूर असल्याने हॉटेलमध्ये कोणाचा कसलाच अडथळा येत नाही.

शांत व निवांत वातावरणात लग्न सोहळे व विविध खासगी कंपन्यांचे परिषदा होतात. या मंडळींच्या मनोरंजनासाठी रात्री करमणुकीचे कार्यक्रम होतात. यासाठी हॉटेलच्या लॉनवर व्यासपीठ उभारून कर्णकर्कश आवाजात कार्यक्रम पार पडतात. दारू पिऊन रात्रभर धिंगाणा सुरू असतो. रात्री दहानंतर ध्वनीक्षेपकांवर बंदी आहे. याचे भानही या मंडळींना नसते. गावच्या पर्यटनावर परिणाम होईल म्हणून येथील स्थानिक नागरिक निमूटपणे सहन असतात. काहीवेळा तक्रार करूनही कोणी दखल घेत नाही त्यामुळे अनेक वर्षे येथे मोठ्या प्रमाणावर ध्वनी प्रदूषणाचा त्रास येथील जनता सहन करीत आहे. परंतु यासंदर्भात प्रदूषण नियंत्रण मंडळाने कारवाईचा चांगलाच बडगा उगारला आहे.विधानसभेत घुमला आवाजयेथील हॉटेल किजमध्ये लग्न सोहळ्यानिमित्त आयोजित करमणुकीच्या कार्यक्रमासाठी रात्री उशिरापर्यंत ध्वनीक्षेपक सुरू होते. यासंदर्भात अनेकांनी पोलिस ठाण्यात तक्रारी केल्या; परंतु पोलिसांकडून दुर्लक्ष झाले. रात्री दोन वाजता कार्यक्रम संपल्यानंतर ध्वनीक्षेपक बंद झाला. याप्रकाराने चिडलेल्या काही नागरिकांनी पालकमंत्री व पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्याकडे तक्रारी केल्या. दरम्यान, या तक्रारीबाबत विधान परीषदेत हा प्रश्न उपस्थित केला. तेव्हा ‘ध्वनीप्रदूषण करणाºया अशा हॉटेलवर कारवाई करण्यात येईल,’ असे आश्वासन पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी दिले. त्यानंतर वेगाने सूत्रे हलण्यास सुरुवात झाली. रामदास कदम यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सातारा कार्यालयाचे प्रमुखांना थेट कारवाई करण्याचे आदेश दिले.कारमध्येही गाणी लावून पर्यटकांचा गोंधळमहाबळेश्वर हा जंगली भाग आहे. या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे वाद्य वाजविण्यास परवानगी नसते. तरीही काही हौशी पर्यटक महाबळेश्वर परिसरातील रस्त्याच्या कडेला आपापल्या गाड्या उभ्या करून त्यामध्ये मोठ्या आवाजात गाणी लावून नाचत असतात. मोठ्या आवाजामुळे आजूबाजूच्या स्थानिक रहिवाशांना याचा त्रास होतोच. शिवाय जंगलातील वन्य प्राण्यांच्या हालचालीवरही परिणाम होतो. त्यामुळे बिथरलेले प्राणी पर्यटकांवर हल्ला करू शकतात, याचा अभ्यास होणे गरजेचे आहे.